|| छत्रपती सुत्र ||
येणाऱ्या भविष्यकाळात रडावं लागु नये
म्हणुन
आताच वर्तमानकाळातच तुम्हाला लढावं लागेल.
परंतु आता वर्तमानकाळात लढावं लागण्यासाठी
आधी भूतकाळातुन चांगला धडा घेऊन बाहेर पडावं लागेल...
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
येणाऱ्या भविष्यकाळात रडावं लागु नये
म्हणुन
आताच वर्तमानकाळातच तुम्हाला लढावं लागेल.
परंतु आता वर्तमानकाळात लढावं लागण्यासाठी
आधी भूतकाळातुन चांगला धडा घेऊन बाहेर पडावं लागेल...
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
काळजी करुन दुःख कमी होत नाही तर कृती केल्यानेच त्या दुःखावर मात करता येते.
काळजी केल्याने कृतीसाठी आवश्यक ताकद वाया जाते आणि दुःख आहे तसेच राहते..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
आयुष्यात अनेकदा येणाऱ्या संभ्रमाच्या प्रसंगांतुन मार्ग काढण्यासाठी नेहमी आपल्या कर्तव्याला महत्व द्या.
तुम्ही ज्यावेळी कर्तव्याला प्राधान्य देऊन धडपड चालु करता,
त्यावेळी बाकी साऱ्या संभ्रमाच्या समस्यांवर सुध्दा मार्ग निघायला सुरुवात होते..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
तुम्ही चुकीच्या वाटेवरुन चालत असाल तर तुमच्या शत्रुच्या संख्येत वाढ होईल,
कारण अशा वाटेवरुन चालताना तुम्ही चांगल्या माणसांशी शत्रुत्व घेत असता.
अशा वाटेवरुन माघारी फिरणेच योग्य आहे.
तुम्ही योग्य वाटेवरुन चालत असाल तरीही तुमच्या शत्रुच्या संख्येत वाढच होईल,
कारण अशा वाटेवरुन चालताना तुम्हाला वाईट माणसांशी शत्रुत्व घ्यावे लागते.
अशा वाटेवरुन माघारी न फिरता पुढे चालत राहणेच योग्य आहे..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
दिव्याची वात नेहमी तेवत ठेवायची म्हटले तर वातीला सतत तेल पुरवावे लागतेच,
त्यासोबत वाऱ्यापासुन त्या वातीचे संरक्षण करण्यासाठी आडोसाही द्यावा लागतो.
माणसाच्या प्रगतीच्या दिव्याची वातही तशीच आहे.
तिला सतत ध्येयाचे तेल तर पुरवावे लागतेच,
त्यासोबत अपयशाच्या वाऱ्यापासुन संरक्षण करण्यासाठी प्रयत्नांचा आडोसाही द्यावा लागतो..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
वाऱ्याच्या दिशेने आपली दिशा आणि योजना बदलणारी माणसं स्वतःची ओळख निर्माण करु शकत नसतात.
नाव तर त्यांचे घेतले जाते
जे वारे विरुध्द दिशेने वाहत असताना सुध्दा नियोजित वाटचाल करुन आपलं निशान आपल्या ध्येयाच्या शिखरावर फडकवतात..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
जो बदल तुम्हाला समाजात हवा आहे,
तो बदल प्रथम तुमच्यात घडवा.
प्रत्येक बदलाची सुरुवात स्वतःपासुन होते.
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
आपल्या जवळ असणाऱ्या वाईट माणसांना दूर केल्याशिवाय,
आपल्यापासुन दूर असणाऱ्या चांगल्या माणसांना जवळ करता येत नाही.
ही चांगली माणसं त्यांच्या चांगल्या अनुभवामुळे नेहमीच आठवणीत राहतात.
माणसं सुगंधी फुलांनाच जवळ करतात,
दुर्गंधी फुलांना कोणी पाणी सुध्दा घालत नाही..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
तुम्हाला जर एखादे काम चांगल्या पध्दतीने व्हावे असे वाटत असेल
तर एक करा,
ते काम स्वतःच करा.
जो बदल आपल्याला इतरांमध्ये हवा असतो,
तो बदल आधी स्वतःमधे घडवायला हवा..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
माणसाची प्रतिष्ठा ही त्याच्या सावलीसारखी असते.
जेव्हा ही माणसाच्या पुढे चालते तेव्हा खुप मोठी होत जाते
आणि
जेव्हा मागे चालते तेव्हा खुप छोटी होत जाते..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
एखाद्या गोष्टीची तीव्र गरज निर्माण झाल्याशिवाय त्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी धाडसी पावले उचलली जात नाहीत.
ध्येयाचा ध्यास लागला तरच श्रमाचा त्रास होत नाही..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
अपयशासाठी परिस्थितीला दोष देणे हे मैदानातुन पळ काढण्यासारखे आहे.
आत्मपरीक्षण करुन आपण कुठे कमी पडलो हे शोधता आलं
तर
भावी यशाचे यशस्वी नियोजन करता येते..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्या उंचीवर पोचलात यावरुन तुमच्या यशाचे मोजमाप होत नाही.
खाली पडुनसुध्दा तुम्ही पुन्हा किती वेळा परत उसळी मारुन उभे राहिलात यावरुन तुमच्या यशाचे मोजमाप होते..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
एखादा सामान्य माणुसही जेव्हा उच्च ध्येय नजरेसमोर ठेवुन समाजात वावरु लागतो,
तेव्हा धाडसीपणा आणि साहसीपणा तिच्यात आपोआप निर्माण होतो.
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
भुतकाळात जावुन कोणत्याही गोष्टींची पुन्हा नव्याने सुरवात करणे कुणालाही शक्य नाही
परंतु
आज सुरुवात करून आपला येणारा भविष्यकाळ चांगला करणे,
हे कुणालाही शक्य आहे.
सर्वच नसले तरी निदान काही बदल तरी माणसाच्या हातात असतातच..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
यशस्वी लोक कधीच आपल्या निकालाचे नियोजन करून ठेवत नाहीत.
ते फक्त सुरवात कशी करायची ह्यावर जास्त भर देतात
कारण
सुरुवात ही व्यवस्थित आणि संघर्षाने केलेली असेल तर निकाल हा नेहमी त्यांच्याच बाजुने असतो..
नेहमीच चांगली सुरवात करा..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
चुका म्हणजेच शिक्षण
आणि
शिक्षण म्हणजेच जुन्या चुका परत होऊ न देणे.
काही गोष्टी या अनुभवातुनच शिकता येतात.त्यामुळे चुकांतुन शिकतच पुढे जायचे असते.
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
नेहमी यश मिळत असेल तर आपल्या जीवनाची केवळ एकच बाजु कळते,
पण अपयश जीवनाची दुसरी बाजु दाखवते..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
अपयश म्हणजे संकट नाही
तर
आपल्या ध्येयाच्या मार्गावर दिशा दाखवणारा मैलाचा दगड आहे..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
विनाकारण शत्रुंची संख्या वाढवुन वाटेत अडचणी निर्माण करुन घेण्यापेक्षा
नेहमी मित्रांची संख्या वाढवुन यशाचा राजमार्ग तयार करत रहा..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
प्रत्येक अडचणीमध्ये एक संधी दडलेली असते.
जो अडचणींनी निराश होतो तो कायमचा संपून जातो.
पण
जो अडचणीवर मात करून तिच्यातल्या संधीचा फायदा घेतो तोच पुढे जातो..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
हे जग धाडसी लोकांकरीताच आहे.
स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला अजुन किती मैल पळावे लागेल हे कोणीच सांगु शकत नाही.
पण तुम्हाला पळावेच लागेल कारण थांबला तो संपला..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
अपयश हीच यशाची पहीली पायरी नसते..
कारण
योग्य नियोजन,योग्य अभ्यास आणि योग्य प्रयत्न असतील पहीली पायरीसुध्दा यशाचीच असते..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
ज्याला निर्णय घेता येत नाही
त्याला कृती करता येत नाही
आणि
ज्याला कृती करता येत नाही
त्याला कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही.
केवळ एक धाडसी निर्णयच तुमचे संपुर्ण आयुष्य बदलु शकतो..
@ अनिल माने
|| छत्रपती सुत्र ||
प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या.
प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे
आणि
काळ फार वेगाने पुढे जात आहे.
म्हणून
आपल्या संपुर्ण ताकदीने कामाला लागा
तेव्हाच तुम्ही ध्येय गाठु शकाल..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
मनुष्य गेल्यानंतर मागे फक्त त्याचा चांगुलपणा राहतो..
बाकी सगळं नष्ट होते..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
वेळोवेळी बदल करण्यात जोखिम नसुन बदल न करण्यात जोखिम आहे.
बदल केल्याने जीवनाचा प्रवास चालु राहतो
पण
बदल न केल्याने आपण आहे तिथेच अडकुन पडतो..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
आपल्या अनुपस्थिती मुळे एखाद्याच्या आयुष्यात काहीच फरक पडत नसेल
तर
आपल्या उपस्थीती मुळे सुध्दा त्याच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही..
@ अनिल माने.
मंझिल तो मिल ही जायेगी
चाहे भटककर ही सही
गुमराह तो वोह लोग होते हैं
जो घर से निकलते ही नही..
|| छत्रपती सुत्र ||
जोपर्यंत आपण आपल्या मनाने हार स्वीकारत नाही,
तोपर्यंत आपला पराभव झालेला नसतो..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
आपणच निवडलेली एखादी छोटी वाट एखाद्या नवीन प्रवासाची सुरुवात होऊ शकते.
दुसऱ्यांच्या डोळ्यांनी आयुष्याकडे बघण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांनी आयुष्याकडे बघितले तर आयुष्य जास्त सुंदर दिसते..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
सकारात्मक विचार सकारात्मक उर्जा आकर्षित करतात.
सकारात्मक उर्जा सकारात्मकच कार्य घडवुन आणते.
नेहमी सकारात्मक विचार करा.
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
झाडाला एकच पान असले तरी ते आपली सावली निर्माण करते,
कारण उन्हाच्या झळा त्याने अनुभवलेल्या असतात.
माणसानं यापेक्षा वेगळे काही करण्यापेक्षा,
आपणही कुणाच्यातरी आयुष्यात सावली कसे होऊ शकेल हा विचार करणे खरी माणुसकी ठरेल..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
पराक्रमाचं मातृत्व जरी पुरुषांकडे असलं
तरी
मातृत्वाचा पराक्रम फक्त स्त्रीच करु शकते..
राष्ट्रमाता जिजाऊंचा जयजयकार
|| छत्रपती सुत्र ||
वाटेतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी अडथळ्यांचा सामना न करणाऱ्या माणसांपेक्षा
अडथळ्यांवर मात करुन जाणारी माणसे अधिक सुरक्षीत असतात.
आपले यश हे आपण प्राप्त केलेल्या पदावरून किंवा स्थानावरुन ठरवले जात नाही
तर
ते स्थान किंवा दर्जा मिळविण्यासाठी जे अडथळे पार करावे लागले त्यावरुन ठरतं..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
बंद डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने लक्षात नाही राहीली तरी चालतील
पण
उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांवर नेहमीच लक्ष ठेवता आलं पाहिजे.
कळी उमलल्याशिवाय फुलाच्या सुगंधाची किंमत कळत नाही..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
आयुष्यात घेतलेला कुठलाच निर्णय चुकीचा नसतो
पण
तो किती बरोबर आहे ते सिध्द करुन दाखवावा लागतो.
मग तो घेतलेला निर्णय चांगला असो अथवा वाईट असो..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
या जगात कोणालाच निरर्थक समजु नका.
समाजावर जेव्हा नैसर्गिक संकटे,अपघात येतात
तेव्हा या समाजातील विचारवंत,तत्वज्ञानी,सज्जन माणसं निरुपयोगी ठरतात
आणि
समाजाने ज्यांना "टवाळखोर" म्हणुन हिणवलेले असते,
अशी चौकात बसुन टवाळक्या करणारी माणसंच उपयोगी ठरतात.
प्रत्येकात चांगुलपणा असतो.
आपल्या बघण्याची दृष्टी तशी पाहीजे..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
ज्यांचे चारित्र्य,आचार,विचार आणि कृती भक्कम असते,
तेच लोक जीवनात सदाचाराच्या मार्गाने पावले टाकतात
आणि
जीवनाचे ध्येय गाठतात..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
ज्या प्रवासाला ध्येय नाही,तो प्रवास दिशाहीनच असतो
आणि
जो प्रवास दिशाहीन असतो,तो प्रवास कधीच संपत नाही.
समुद्रात भरकटली नाव
आणि
ध्येयहीन माणुस यांचा प्रवास स्वतःच्या इच्छेप्रमाणे कधीच होत नाही..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
जे धडपड करतील त्यांनाच वेदना होतील
आणि
वेदना झाल्याशिवाय मिळणाऱ्या यशाचा आनंद हा कवडीमोल असतो.
जे किनाऱ्यावरच उभे राहतील ते कधीच पोहायला शिकणार नाहीत..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
अपयशाचा ॠतु हीच यशाचे बीज पेरण्याची सर्वात चांगली वेळ असते..
अपयश तुम्हाला जगाची ओळख घडवते
आणि
यश जगाला तुमची ओळख घडवते..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
रुळलेल्या आणि मळलेल्या पायवाटा या जुन्याच ठिकाणी जात असतात.
नवीन ठिकाणावर जायचे असेल तर स्वतःलाच नवीन पायवाट तयार करण्याचे कष्ट घ्यावे लागते..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
माणसाचे यश हे त्याच्या प्रयत्नांना आणि अपयश हे त्याच्या आळसाला चिकटलेले असते..
@ अनिल माने.
|| शिवमान्य ६ जुन ||
शिवरायांनी राज्याभिषेकासाठी ६ जुन हीच तारीख का निवडली ?
● आपल्या कर्तृत्वाची जाणीव दाही दिशांना आणि आलम दुनियेला व्हावी आणि त्याचवेळी मोगलांना ह्या देशात स्वतंत्र स्वाभिमानी स्वराज्याची स्थापना झाली हे कळावे यासाठीच कोणत्याही मुहुर्ताची वाट न बघता महाराजांनी ६ जुन ही तारीख जाणीवपुर्वक राज्याभिषेकासाठी निवडली.
मोगलांना त्यांच्या ढासळत्या डोलाऱ्याची जाणीव करुन दिली.त्यांचा तिळपापड केला.
● महाराजांच्या राज्यभिषेकास त्याकाळी धर्मविधी करणाऱ्या सर्वच पुरोहीत ब्राह्मण वर्गाने जाहीर विरोध केला आणि महाराज वैदिक धर्मानुसार शुद्र असल्यामुळे राज्याभिषेकास पात्र नाहीत असेच सगळे ब्राह्मण पुरोहीत सांगत होते.यामुळे महाराजांनी राज्यभिषेकासाठी काशीवरुन भरमसाठ लाच देऊन गागाभटासारख्या पुरोहीताला आणावे लागले.
● ६ जुन हा मृग नक्षत्राचा आदला दिवस.कृषी संस्कृतीशी जवळचा दिवस.
देशात मृग नक्षत्र ७ जुनलाच सुरु होते.त्यात काहीच बदल नाही.महाराष्ट्रात,कोकणासह सगळीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या मृग नक्षत्रात प्रामुख्याने होतात.म्हणजेच शेतीची कामे ७ जुनपासून सुरु होतात.शेतकऱ्यांना सोयीचे जावे व शेतकऱ्यांचाच एक आनंदाचा क्षण ठरावा,म्हणुन त्याकाळी रोहीणी व मृग नक्षत्राचा जोड दिवस म्हणुन ६ जून हा दिवस निवडला गेला.
● त्याकाळी ६ जून १६७४ रोजी रायगडचे वातावरण निरभ्र होते,पाऊस नव्हता,शेतकऱ्यांनापण सोयीचे होते.हे सुध्दा महत्वाचे कारण आहे.
● जर महाराजांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला असता त्यांनी ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ सांगितला असता.
कारण दक्षिणायण-उत्तरायण भानगड.
परंतु महाराजांना वेगेवेगळ्या शत्रुंच्या हालचालींवर लक्ष देणे आवश्यक होते.लोक दक्षिणायन वर्ज्य मानतात.परंतु महाराज आवर्जुन दक्षिणायनातील जुन महिना निवडतात,कारण शत्रुला चकमा देण्यासाठी.
राज्य राहिले तर राज्याभिषेक होईल,म्हणुन राज्य-रयत ह्यांची काळजी अगोदर.
● मुहूर्त पंचांग आणि योग्य संधी याचा काही संबंध नसतो हे महाराजांनी अनेक मोहिमा आणि त्यातच राज्यभिषेक या सर्वात मोठ्या प्रसंगीही सिद्ध करून दाखविले.
● ६ जुन तारीख निवडण्यामागे आणखी एक मोठा राष्ट्रीय उद्देश होता.
औरंगजेबाचा सिंहासनरोहणाचा खास कार्यक्रम ५ जुन १६५९ या दिवशी झाला होता.
आता तुमच्या मोगलाईचा अस्त होऊन स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितीजावर उगवलेला आहे हे दाखवून देण्यासाठीच महाराजांनी ५ जुनच्या मध्यरात्रीपासुन राज्यभिषेक प्रक्रिया सुरु करुन ६ जुन १६७४ रोजी किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक केला..
महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकल्यानंतर औरंगजेब हताशपणे उद्गारला…………
" या खुदा । अब तो हद हो गई ।
तू भी उस सिवा के साथ हो गया !
सिवा "छत्रपती " हो गया ।"
|| काळजात वाजली एकच धुन ||
|| चलो रायगड ६ जुन ||
|| छत्रपती सुत्र ||
प्रेरणा ही आयुष्यातील खुप मोठी गोष्ट आहे.
तुमच्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी आवश्यक असणारी जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास,परिश्रमाची तयारी,आवड तुमच्यात निर्माण करण्याचे काम प्रेरणाच करते..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
काहीच नसते तेव्हा "अभाव" नडतो
थोडेसे असते तेव्हा "भाव" नडतो
जीवनातील एक "कटू सत्य'' हे पण आहे की
जेव्हा सगळं असतं तेव्हा "स्वभाव" नडतो..
|| छत्रपती सुत्र ||
माणसाचं यश-अपयश त्याच्या विचार करण्याच्या पध्दतीवर अवलंबुन असते.
मनाने ठरवलं यशच मिळणार,
तर यशच मिळते,
मनाने ठरवलं अपयशच मिळणार,
तर अपयशच मिळते.
दोन्ही ठिकाणी तुमचेच मन निर्णय घेते..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
माणसाचं आयुष्य अगदी कोळशापासुन बनणाऱ्या सुगंधी अगरबत्ती सारखंच आहे.
एकदा पेटवल्यावर ते कधी ना कधी जळुन संपणारच..
जोपर्यंत ही अगरबत्ती जळत आहे तोपर्यंत जर आपल्या आजुबाजुच्या वातावरणाला सुगंधाने भरुन टाकत असेल,
तरच तिच्या जळण्याला अर्थ आहे.
कारण एकदा ती अगरबत्ती जळुन गेल्यानंतर मागे फक्त राख उरते,
ज्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा..
कारण एक जुनी म्हण आहे
" जे लोक नेहमी फुलेच वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमीच सुगंध दरवळत राहतो..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
ज्या दिवशी तुम्ही यशाचा सामना करण्याची तयारी सुरु करता,
त्याच दिवशी अपयशाचा सामना करण्याची सुध्दा तयारी सुरु करा.
यशाकडे जाणाऱ्या रस्त्यात अपयशाचे खड्डे असु शकतात..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
आपले ध्येय जर प्रामाणिक असेल आणि आपली वाटचाल योग्य दिशेने होत असेल
तर
लोक काय म्हणतील याचा विचार करु नका.
जोपर्यंत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात,
तोपर्यंत लोकांच्या म्हणण्याला काहीच किंमत नसते आणि त्याने काही फरकही पडत नाही..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
यश मिळविण्यासाठी नेमका निर्णय,नेमक्या वेळी घेणे महत्वाचे असते.
निर्णय घेतल्याशिवाय आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही.
ज्या व्यक्तिला जीवनात योग्य निर्णय घेता येतो,
त्याने स्वतःच्या आयुष्याची अर्धी लढाई जिंकल्यासारखीच असते.
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट
नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्ट पुर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश
आणि
जे मिळालं आहे ते गोड वाटणं म्हणजे सुख..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
शिवराज्याभिषेक दिन ६ जुन राष्ट्रीय सण जाहीर करा...
www.facebook.com/chhatrapatisutra
जय जिजाऊ
तमाम बहुजनांचे आराध्य दैवत कुळवाडीभुषण छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा ६ जुन १६७४ ला किल्ले रायगडवर पार पडला.रयतेला वाली मिळाला.हा दिवस बहुजनांचा पहीला स्वातंत्र्यदिन आहे.
त्यामुळेच दिवसेंदिवस हा दिवस बहुजन समाजाकडुन मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे.
या दिवशी किल्ले रायगडवर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक हजेरी लावत आहेत.दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे.
युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्ववाली या सोहळ्यास लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त होत आहे.
त्यामुळे ६ जुन हा दिवस राष्ट्रीय सण म्हणु जाहीर करावा अशी आग्रही मागणी समाजातील सर्व स्तरावरील जनमाणसांमधुन जोर धरु लागली आहे.
शासनने याबाबत पाऊले उचलुन तमाम शिवप्रेमी जनतेच्या मागणीचा आदर करुन शिवराज्याभिषेक दिन ६ जुन हा राष्ट्रीय सण म्हणुन घोषित करावा ही अपेक्षा..
हा सण कशा प्रकारे साजरा करावा याबाबत माझे मत...
● ज्यांना ज्यांना शक्य आहे,त्यांनी कुटुंब/मित्रांसमवेत ६ जुन या दिवशी किल्ले रायगडवरती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहुन महाराजांना अभिवादन करावे.
● ज्यांना रायगडवर जाणे शक्य नसेल त्यांनी घरी सर्वांनी सकाळी लवकर उठावे.
दारात रांगोळ्या काढाव्यात.
घरावर भगवा शिवध्वज लावावा.
घरी गोडधोड,पुरणपोळीचा स्वयंपाक करावा.
मित्र/नातेवाईक यांना घरी जेवणास बोलवावे.
● घरात तसेच गावात सर्वांनी एकत्रीत जमुन छत्रपती शिवरायांच्या मुर्ती/प्रतिमेला पुष्पहार घालुन दुग्धाभिषेक घालावा.
शिवरायांना अभिवादन करावे.
जिजाऊ वंदना म्हणावी.
● घरी व गावात आनंदी वातावरण असावे.
● एकमेकांच्या घरी जाऊन मिठाई भरवुन एकमेकांना शिवराज्याभिषेक दिनाच्या सदिच्छा द्याव्यात.
● या दिवशी नवीन संकल्प,खरेदी कराव्यात.
● गावात प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यावेत.
● या दिवसाचे पावित्र्य,मांगल्य,महत्व राखले जाईल याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.
|| सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटी कोटी शिवमय सदिच्छा ||
-अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
या आयुष्यात एवढेपण कडवट होऊ नये
की लोक आपल्यावर थुंकतील
आणि
एवढे गोड ही होऊ नये
की लोक आपल्याला खाऊन टाकतील..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
बदल हे प्रगतीचे लक्षण आहे.
चांगले बदल करताना थोडा त्रास होईल
परंतु
त्याचा फायदा जीवनभर असतो..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
काही झाडे खुप उंच जातात,
कारण त्यांच्या मुळ्याही तितक्याच खोलवर रुजलेल्या असतात.
माणसांचंही असंच असते.
आयुष्यात झाडासारखी खुप उंची गाठायची असेल
तर
प्रयत्नांच्या मुळ्यांना तितक्याच जास्त खोलवर रुजवले गेले पाहिजे..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
आयुष्य हे लोखंडासारखं आहे.
गंज लागुन संपवायचे का घासुन झिजुन संपवायचे ते सर्वस्वी तुमच्या हातात असते.
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
प्रत्येकजण जन्माला आलेत तर जाण्यापुर्वी प्रत्येकाने स्वतःचा इतिहास घडवुन जावा.
कारण तुमच्या जीवनात दोन दिवस खुप महत्वाचे असतात.
ज्यादिवशी तुम्ही जन्माला आलात तो
आणि
ज्या दिवशी तुम्ही सिद्ध करता की तुम्ही कशासाठी जन्माला आला आहात तो..
@ अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
स्पर्धेत टिकण्यासाठी इतरांपेक्षा सरस राहणे आवश्यक आहे.
यशस्वी माणसं अपयशी माणसांपेक्षा जास्त हुशार नसतात.
ते थोडेसेच सरस असल्यामुळे त्यांना मिळणारा फायदा जास्त असतो..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
प्रयत्नांची पायवाटच मुक्कामापर्यंत पोचते कारण अशी पायवाट वेडीवाकडी असली तरी ती ओळखीची असते.
पळवाटांचे फाटे माणसाची दिशाभुल करुन त्याला मुक्कामापर्यंत पोचु देत नाहीत आणि अशा फाट्यांनी प्रवास करणाऱ्या लोकांना याची जाणीव व्हायला खुप उशीर लागतो..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
तुमच्या वाटेत बाधा आणण्याचा प्रयत्न करणारे लोक तोपर्यंत त्यांच्या उद्देशात सफल होत नाहीत,
जोपर्यंत तुम्ही आपले लक्ष आपल्या ध्येयावरुन काढुन त्यांच्याकडे वळवत नाही.
तुमची प्रगती हीच तुमच्या शत्रुंसाठी खुप खुप मोठी शिक्षा असते..
© अनिल माने.
|| छत्रपती सुत्र ||
तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात लगेच करा.
कारण आयुष्यात असे अनेक चांगले निर्णय असतात जे केवळ सुरुवातच न करण्यामुळे तसेच राहुन जातात.
@ अनिल माने.