आठवणी आहेत तिथं आनंद आहे...
#जिंदगीडॉटकॉम
|| छत्रपती सुत्र ||
उसन्या बळावर लढणारे लोक दुर्बलतेचे पाईक आहेत.
उसने बळ घेऊन ओरडायला ताकत लागत नाही,खरी ताकत तर शांत रहायला लागते.
तुमचे शांत राहणे ही तुमची दुर्बलता नसुन ती उसन्या बळावर ओरडणाऱ्यांच्या आवाजावरील दणदणीत मात आहे.
© अनिल माने.
=========================
|| छत्रपती सुत्र ||
जंगलात पेटलेल्या वणव्यात जोपर्यंत पालापाचोळा येत असतो तोपर्यंत हा वणवा न विझता तसाच पेटत राहतो आणि जंगलाची राख करतो.
नात्यांमधे दुरावा निर्माण करणारा वणवा हा अशाच गैरसमज आणि अफवांच्या पालापाचोळ्यावर पेटत राहतो.हा पालापाचोळाच संपला की ही वणवाही आपोआप विझुन जातो.
© अनिल माने.
===========================
|| छत्रपती सुत्र ||
शेवटच्या घावाने दगड फुटला म्हणुन आधीच्या घावांचे काहीच महत्व नाही असे नाही.
प्रयत्नातील सातत्यच तुमच्या यशाचे कारण बनते.
जशी पाण्याची संततधार कठीण खडकाचीही माती करुन टाकते..
© अनिल माने.
=======================
|| छत्रपती सुत्र ||
बोथट शस्त्रे रणांगणावरील लढाईत निरुपयोगी ठरतात,
परंतु त्यांना धार लावली तर त्यांचेही मुल्य वाढते.
स्पर्धेच्या युगात विचारांची धार नसलेले लोक मागे पडतात,
परंतु बुध्दीला विचारांची धार असेल तर ते स्पर्धेत विजयी होतात.
© अनिल माने.
===========================
|| छत्रपती सुत्र ||
उत्कर्षाच्या मुक्कामाला पोचायचे असेल तर संघर्षाचा मार्ग पार करावा लागतो.
या संघर्षात प्रतिस्पर्धी कोण आहे त्यापेक्षा त्याच्या आणि आपल्या जमेच्या व कमकुवत बाजुंचे योग्य ज्ञान असेल तर या संघर्षाची पातळी कमी होते.
मात्र संघर्ष अटळ असतो.
© अनिल माने.
===========================