|| शिवमान्य ६ जुन ||
शिवरायांनी राज्याभिषेकासाठी ६ जुन हीच तारीख का निवडली ?
● आपल्या कर्तृत्वाची जाणीव दाही दिशांना आणि आलम दुनियेला व्हावी आणि त्याचवेळी मोगलांना ह्या देशात स्वतंत्र स्वाभिमानी स्वराज्याची स्थापना झाली हे कळावे यासाठीच कोणत्याही मुहुर्ताची वाट न बघता महाराजांनी ६ जुन ही तारीख जाणीवपुर्वक राज्याभिषेकासाठी निवडली.
मोगलांना त्यांच्या ढासळत्या डोलाऱ्याची जाणीव करुन दिली.त्यांचा तिळपापड केला.
● महाराजांच्या राज्यभिषेकास त्याकाळी धर्मविधी करणाऱ्या सर्वच पुरोहीत ब्राह्मण वर्गाने जाहीर विरोध केला आणि महाराज वैदिक धर्मानुसार शुद्र असल्यामुळे राज्याभिषेकास पात्र नाहीत असेच सगळे ब्राह्मण पुरोहीत सांगत होते.यामुळे महाराजांनी राज्यभिषेकासाठी काशीवरुन भरमसाठ लाच देऊन गागाभटासारख्या पुरोहीताला आणावे लागले.
● ६ जुन हा मृग नक्षत्राचा आदला दिवस.कृषी संस्कृतीशी जवळचा दिवस.
देशात मृग नक्षत्र ७ जुनलाच सुरु होते.त्यात काहीच बदल नाही.महाराष्ट्रात,कोकणासह सगळीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या मृग नक्षत्रात प्रामुख्याने होतात.म्हणजेच शेतीची कामे ७ जुनपासून सुरु होतात.शेतकऱ्यांना सोयीचे जावे व शेतकऱ्यांचाच एक आनंदाचा क्षण ठरावा,म्हणुन त्याकाळी रोहीणी व मृग नक्षत्राचा जोड दिवस म्हणुन ६ जून हा दिवस निवडला गेला.
● त्याकाळी ६ जून १६७४ रोजी रायगडचे वातावरण निरभ्र होते,पाऊस नव्हता,शेतकऱ्यांनापण सोयीचे होते.हे सुध्दा महत्वाचे कारण आहे.
● जर महाराजांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला असता त्यांनी ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ सांगितला असता.
कारण दक्षिणायण-उत्तरायण भानगड.
परंतु महाराजांना वेगेवेगळ्या शत्रुंच्या हालचालींवर लक्ष देणे आवश्यक होते.लोक दक्षिणायन वर्ज्य मानतात.परंतु महाराज आवर्जुन दक्षिणायनातील जुन महिना निवडतात,कारण शत्रुला चकमा देण्यासाठी.
राज्य राहिले तर राज्याभिषेक होईल,म्हणुन राज्य-रयत ह्यांची काळजी अगोदर.
● मुहूर्त पंचांग आणि योग्य संधी याचा काही संबंध नसतो हे महाराजांनी अनेक मोहिमा आणि त्यातच राज्यभिषेक या सर्वात मोठ्या प्रसंगीही सिद्ध करून दाखविले.
● ६ जुन तारीख निवडण्यामागे आणखी एक मोठा राष्ट्रीय उद्देश होता.
औरंगजेबाचा सिंहासनरोहणाचा खास कार्यक्रम ५ जुन १६५९ या दिवशी झाला होता.
आता तुमच्या मोगलाईचा अस्त होऊन स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितीजावर उगवलेला आहे हे दाखवून देण्यासाठीच महाराजांनी ५ जुनच्या मध्यरात्रीपासुन राज्यभिषेक प्रक्रिया सुरु करुन ६ जुन १६७४ रोजी किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक केला..
महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकल्यानंतर औरंगजेब हताशपणे उद्गारला…………
" या खुदा । अब तो हद हो गई ।
तू भी उस सिवा के साथ हो गया !
सिवा "छत्रपती " हो गया ।"
|| काळजात वाजली एकच धुन ||
|| चलो रायगड ६ जुन ||